सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महायुती सरकारला झटका !
बुधवार, 30 जुलाई 2025
 Comment 
• दोषीवर गुन्हा दाखल होण्यासोबतच न्यायालयाचा अवमान केल्याने सरकारही अडचणीत
''साप्ता.जनता की आवाज"नेटवर्क  
मुंबई :- काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारला मोठा झटका दिला आहे, मोमनराध सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालो होता, असा दावा पोलीस आणि राज्य सरकारने केला होता. मात्र, पोलिसाच्या मारहाणीमुळे पोलीस कोठडीत सोमनाथध मुर्यवंशी बाचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. प्रकाश आंबेडकर बांनी हे प्रकरण न्यायालयात लावून घाले होते. त्यासाठी प्रकाश आवेडकर यांनी अनेक वर्षांनी
काळा कोट चढवून कोर्टात युक्तिवादही केला होता. मानंतर उच्ब न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारने निकाल दिला होता. याविरोधात राज्य सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भात्र, आता सोच्न न्यायालयानेही मुंबई उच्य न्यायालयाचा निकाल उचलून धरत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवला आहे. हा महायुती सरकारसाठी मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल
होण्याची शक्यता आहे. तसेच उज्ब न्यायालयाच्या आदेशाची पायमट्टी फैल्याप्रकरणी राज्य सरकारही अडचणीत घेण्याची शक्यता आहे.
प्रकाश आबेडकर यांनी यासंदर्भात माहिती देतारा सांगितले की, महा राज्य आणि इतर बिरुद्ध विजयबाई बैंकर सूर्यवंशी या खटल्यात माननीय सर्वोच् न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. बानंतर प्रकाश प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या निकालाचे मबिस्तर विवेचन केले.
• डॉक्टर्स आणि पोलिसांच्या अडचणी वाढणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे राज्य सरकार, पोलीस आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आम्ही यामध्ये जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांना आरोपी करण्याची मागणी करणार आहोत, कोर्टाचा आदेश असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांना आरोपी करा, अशी मागणी करणार आहोत. या निकालामुळे पहिल्यांदाच पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणांच्या चौकशीसाठी मार्गदर्शक तत्वं आखली जाणार आहेत. आता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणाची चौकशी एसआयटी स्थापन करून होईल की आयोगामार्फत हील, हे कोर्ट ठरवेल, जो कोणी एसआयटी किंवा आयोग नेमेल, त्याच्यावर नियंत्रण कोणी ठेवायचं हा प्रश्न आहे, तो एकदा निकालात निधाला की चौकशी सुरु होईल, याप्रकरणात प्रशासन हे पोलिसांना बाचवण्याचा प्रयत्न करत आहे. परभणीत जे कोम्बिंग ऑपरेशन झालं त्याची दखल न्यायालयाने घेतली आहे. हे कोम्बिंग ऑपरेशन कुठल्या कारणासाठी आणि कोणत्या कायद्यातंर्गत करण्यात आले, हा चौकशीचा भाग आहे. त्यामुळे आता या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले सर्व पोलीस आरोपी होण्याची शक्यता आहे, असे प्रकाश आबेडकर यांनी सांगितले. 
0 Response to "सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महायुती सरकारला झटका !"
एक टिप्पणी भेजें