-->
15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त.

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त.


.    संकलन :- हर्षवर्धन देशभ्रतार 
 साप्ताहिक :- अरुण बुंदेले 

राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन : जाज्वल्य अभिमान 

               १५ ऑगस्ट २०२६ ला असलेल्या 
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ॥ हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि महत्त्वाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या प्रदीर्घ गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आणि क्रांतिकारकांनी क्रांतीची मशाल पेटवून आपल्या प्राणांचे बलिदान दिले. महात्मा गांधी, भगतसिंग,राजगुरू,सुखदेव,
चंद्रशेखर आझाद,सुभाषचंद्र बोस,मंगल पांडे,खुदीराम बोस,मदनलाल धिंग्रा,बाबू गेनू,वासुदेव बळवंत फडके,चाफेकर बंधू 
या व इतर अनेक यासारख्या महान देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्य दिन आपल्याला या वीरांच्या त्यागाची आणि संघर्षाची आठवण करून देतो. 
            १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे, जो संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करतात आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेतात. सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. या दिवशी विद्यार्थी राष्ट्रगीत गातात आणि देशभक्तीपर गीते सादर करतात. शाळांमध्ये विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून आनंद साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशातील विविधतेत एकता दर्शवतो. हा दिवस आपल्याला जात, धर्म आणि पंथ विसरून एकत्र येण्याची प्रेरणा देतो. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्याला स्वतःचे सरकार आणि संविधान बनवण्याचा अधिकार मिळाला. हा दिवस आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो. स्वातंत्र्यामुळे भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आज भारत जगातील एक शक्तिशाली आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, परंतु या स्वातंत्र्यासोबतच देशाची शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. देशातील गरिबी, निरक्षरता ,बेरोजगारी आणि भ्रष्टाचार नष्ट करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य दिन आपल्याला देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेण्याची संधी देतो. आपल्या सीमेवर अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण तरुणांमध्ये देशभक्तीची, शिस्तीची आणि देशसेवेची भावना जागृत करतो. प्रत्येक नागरिकाने देशाच्या कायद्याचा, नियमांचा आणि संविधानाचा आदर केला पाहिजे. आपला राष्ट्रीय ध्वज 'तिरंगा' हा आपल्या देशाच्या सन्मानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. या दिवशी आपण सर्वांनी मिळून देशाची अखंडता आणि एकता टिकवून ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वातंत्र्य ही केवळ एक संकल्पना नसून, ती जबाबदारीने आणि गुण्यागोविंदाने जगण्याची कला आहे. भारताला एक जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. 'जय हिंद' आणि 'वंदे मातरम' च्या घोषणांनी या दिवशी संपूर्ण देश दुमदुमून जातो. पूर्वजांच्या बलिदानातून मिळालेले हे अमूल्य स्वातंत्र्य आपण सदैव टिकवून ठेवले पाहिजे.
    १५ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतानाच विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी देशासमोर सध्या अनेक महत्त्वाची आर्थिक, सामाजिक , शैक्षणिक आणि पर्यावरणीय आव्हाने उभी झालेली आहेत त्याचाही विचार होणे आवश्यक आहे,असे मला वाटते.
        भारताकडे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या आहे, परंतु या तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती दरी कमी करणे आणि मध्यमवर्गाला आर्थिक स्थैर्य देणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणावामुळे होणारी महागाई आणि रुपयाचे मूल्य टिकवून ठेवणे या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
 देशात AI, 6G चाचण्या आणि डिजिटल क्रांती वेगाने होत असताना, सायबर गुन्हे, डीपफेक आणि बनावट माहिती रोखणे हे मोठे आव्हान बनले आहे. तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. देशात एकाच वेळी तीव्र उष्णतेच्या लाटा, दुष्काळ किंवा अचानक येणारा पूर ,अनपेक्षित येणारा मान्सून यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वायू प्रदूषण,जल प्रदूषण आणि प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक बनले आहे. कारण पर्यावरण प्रदूषणासोबतच प्राण्यांचे जीव प्लास्टिक कचऱ्यामुळे धोक्यात येत आहेत. सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण व आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक आहे. महिलांवरील आज होणारा अत्याचार थांबवून त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी देणे आवश्यक आहे.आज 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना भारतरत्न - विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येकाने आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अत्यंत लोकप्रिय राष्ट्रभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या 
" या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
 दे वरचि असा दे ॥ "
या अजरामर स्फूर्तीगीताचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाने कार्य करताना मी देशाचा विकास करीत आहे ही भूमिका ठेवून कार्य केले पाहिजे. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो. या विचाराची रुजवणूक भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःच्या मनात निर्माण केली पाहिजे,तेव्हाच भारतीय स्वातंत्र्याचा हा सोहळा साजरा करण्याचा प्रत्येकाला आनंद होईल. ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥

          समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक.

                      अमरावती. ८०८७७४८६०९

0 Response to "15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article