नागपूर ते नागभीड रेल्वे लाईनचे काम मागील पाच वर्षापासून थंडबस्त्यात.
मंगलवार, 18 अगस्त 2026
Comment
• कामाला गती देण्याची गरज -सर्वसामान्य नागरिकांची मागणी
अनेक तरुण बेरोजगार होण्याच्या मार्गावर.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- नागपुर ते नागभीड चालणारी छोटी रेल्वे लाइन मागील ५/६ वर्षापासून बंद झाल्याने अनेक व्यवसायिकांचे व्यवसाय बंद पडले,. दही, दूध ,भाजीपाला ,यासारखे अनेक व्यवसाय बंद झाले . आजुबाजुच्या गावातील हजारोंच्या संख्येने मजुर वर्ग छोट्याशा रेल्वेने कामांसाठी शहरांकडे धाव घ्यायचे, पण आता रेल्वे बंद झाल्यावर उपासमारीची, बेरोजगारीची, आत्महत्येचे प्रकरण वाढले . रोजगाराचा रोजगार बंद पडला . लहाण लहान टप्प्यावर जुनी रेल्वे स्टॉप घ्यायची, पर्यायाने मजुर वर्गाला काम मिळत होता.
झाडीपटटीतील हजारों युवक शहरांकडे धाव घेत होते .परंतू आता शासनांनं मोठ्या रेल्वेचं काम चालु केले परंतु अर्ध्यावरचं येऊन ठप्प का? झालं, हेच कळत नाही आता सामान्य वर्गाला , गोर गरीब जनतेला. या मॅसेजच्या माध्यमातून कळवीण्याचा उद्धेश हाच आहे की, गोर गरीब लोकांचा व त्यांच्या रोजगारांच्या दृष्टीकोनातून विचार करतः शासनाने Emergency स्थगीत वा प्रलंबित असलेलं रेल्वेचं काम लवकर चालू करावे, की ज्यामुळे रोजगारांना रोजगार मिळेल, तसेच दळणवळणाचे व उद्योग धंद्यांची झपाट्यांने भरभराटं जोमाने होइल . रेल्वें चालू झाल्याने ग्रामीण भागाचा, व प्रलंबीत असलेला विकासाला जोमाने वेग मिळेलं . शहराचा व ग्रामीन भागाचा जोमाने विकास होईल याकडे रेल्वे प्रशासन व शासनाने तात्काळ लक्ष देऊन नागपूर ते नागभीड रेल्वे लाईन तात्काळ सुरू करून जनतेला दिलासा देण्यात यावा अशी सर्व सामान्य जनतेची मागणी आहे.
0 Response to "नागपूर ते नागभीड रेल्वे लाईनचे काम मागील पाच वर्षापासून थंडबस्त्यात."
एक टिप्पणी भेजें