-->
सरकार प्रत्येक बाबीला आधार जोडण्यास सांगते तर ओळखपत्र आधार लिंक का करत नाही,हा अनुत्तरित प्रश्न आहे,,

सरकार प्रत्येक बाबीला आधार जोडण्यास सांगते तर ओळखपत्र आधार लिंक का करत नाही,हा अनुत्तरित प्रश्न आहे,,

"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्त प्रतिनिधी 

नांदेड :- राज्यातच नाही तर देशात सर्वत्र सरकारने डिजिटल इंडिया या नावाने उपक्रम सुरू केल्यामुळे प्रत्येक शासकीय उपक्रमासाठी आधार लिंक जोडल्या गेले ते असे की,

• आधार कार्ड - पॅन कार्डला जोडले
• आधार कार्ड - रेशन कार्ड ला जोडले
• आधार कार्ड - बॅंक अकाऊंटला जोडले
• आधार कार्ड - शालांत परीक्षांना जोडले 
• आधार कार्ड - गॅस सिलेंडरला जोडले
• आधार कार्ड - मोबाईल नंबरला जोडले 
• आधार कार्ड - नोकरीवर हजेरीला जोडले 
• आधार कार्ड - सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी जोडणे आवश्यक केले.
पण आधार कार्ड हे मतदान कार्डाला जोडले नाही...
का??????

• कारण.....महाधूर्त राजकारणी.... 

आधारच्या लिंकींगमुळे एकाच नांवाने वेगवेगळ्या ठिकाणचे डबल / ट्रीपल मतदान बंद होईल.... 

एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या नांवाने होणारे मतदान बाद होईल.... 

बोगस नांवाने मिळवली जाणारी मते बाद होतील.
ज्याप्रमाणे रेशन कार्ड मधील बोगस नावे बाद झाली त्याप्रमाणे मतदार यादीतील सुद्धा बोगस नावे बाद होतील. सरकार पॅन कार्ड ला आधार जोडण्यासाठी लोकांवरती १० हजार रुपये दंड लावत आहे. 

म्हणजे तुम्हाला सगळीकडे आधार कार्ड पाहिजे लाडकी बहिण योजना किंवा इतर शासकीय योजनेला तुम्हाला आधार कार्ड पाहिजे. आणि फक्त मतदान ओळखपत्र ला आधार कार्ड नको का..?

लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वांनी वॅक्सिन घेतले होते त्याला सुद्धा लोकांचे आधार कार्ड सरकारने जोडले होते.
 ते काम अतिशय वेगाने झाले होते.
 मग निवडणूक आयोगाचे घोडं कुठे थांबतेयं...?

हाच का स्वच्छ भारत....??? 
    पारदर्शक सरकार..

0 Response to "सरकार प्रत्येक बाबीला आधार जोडण्यास सांगते तर ओळखपत्र आधार लिंक का करत नाही,हा अनुत्तरित प्रश्न आहे,,"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article