भारतीय संविधान देशाचा प्राण - बार्टी समतादूत, सतीश सोमकुवर
शनिवार, 29 नवंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"सामदायक जनता की आवाज"
नागपूर :- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे समतादूत प्रकल्पाअंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय हिंगणा येथे ७६ व्या भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.*
*या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना समतादूत सतीश सोमकुवर यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने विविधतेत एकता निर्माण केली आहे, हा देश विविध जाती,धर्म व पंथांचा असुन सुद्धा संविधानाने सर्वांना एकत्रित गुंफुन ठेवलेले आहे. संविधानामुळे देशातील प्रत्येक वर्गाला पर्याप्त प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. राष्ट्रनिर्मीती साठी व राष्ट्राच्या पायाभरणी साठी भारतीय संविधानाचे महत्वपूर्ण योगदान आहे आणि म्हणूनच भारतीय संविधान देशाचा प्राण असून प्रत्येक नागरिकाची शान आहे. भारतीय संविधान हे सर्वांनी अभ्यासले पाहिजे, ती काळाची गरज आहे आणि संविधानातील मूल्ये समजून घेतली पाहिजे. संविधान माणसाला माणुसकी शिकविते. म्हणूनच भारतीय संविधानाचा जागर होणे गरजेचे आहे. असल्याचे प्रतिपादन बार्टी समतादूत सतीश सोमकुवर यांनी व्यक्त केले. तसेच सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन कार्यक्रमा प्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ठाकरे सर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री रेवतकर सर यांनी केले कार्यक्रमाला इयत्ता ५ ते १२ चे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक,शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.*
0 Response to "भारतीय संविधान देशाचा प्राण - बार्टी समतादूत, सतीश सोमकुवर"
एक टिप्पणी भेजें