भोंदू खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती-अमृता फडणवीस.
सोमवार, 30 मार्च 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुंबई/नागपूर :- भोंदू अशोक खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती.
असे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या, असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याला आज नाशिक येथील एका कोर्टापुढे हजर केला असता कोर्टाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे तो आता १ एप्रिलपर्यंत कोर्टातच राहणार आहे. तूर्त त्याच्या काळ्या कारवायांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या
पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस व्हायरल होत आहेत. या यांनी एका कार्यक्रमात बोलताना उपरोक्त विधान केले आहे. त्या म्हणाल्या, अशोक खरात प्रकरण खूपच भयानक आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. कोणत्याही बाबांवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे योग्य नाही.
आपण आंधळा विश्वास ठेवतो तेव्हा आपला घात होतो. आपल्याला डोळे उघडे ठेवून जगणे आवश्यक आहे. आपण आपल्या ग्रंथांचा आधार घेतला पाहिजे. सर्वकाही आपल्या आत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याकडून अशा बाबा बुवाबाजीला प्रोत्साहन देऊ नका. असे पुढे आल्यावर त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. सरकार याविरोधात आपल्याला मदत करेलच.
0 Response to "भोंदू खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती-अमृता फडणवीस."
एक टिप्पणी भेजें