-->
नव्या पिढीने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा - डॉ. सच्चिदानंद फुलेकर.

नव्या पिढीने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा - डॉ. सच्चिदानंद फुलेकर.

.               डा.प्रा‌.सचिदानंद फुलेकर

            हर्षवर्धन देशभ्रतार 
   "साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर/भंडारा :- इंदुताई शिक्षण संस्थेचे माजी महापौर आणि सचिव, डॉ. सच्चिदानंद फुलेकर यांनी एक प्रभावी आवाहन केले: "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली शिक्षण, सिंचन, कृषी, कायदा, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व यांसारखी अमूल्य मूल्ये पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीने स्वीकारली पाहिजे." डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त, इंदुताई मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे तुमसर येथील फादर हाऊसमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता तुमसर येथील बुद्धभूमीवर शिलाप्रसाद, बुद्धपूजा आणि पुस्तक वितरणाने झाली. त्यानंतर फादर हाऊस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि इंदुताई यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सच्चिदानंद फुलेकर होते, तर उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व नाटककार प्रभाकर दुपारे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये शास्त्रज्ञ डॉ.मधुसूदन फुलेकर, माजी मुख्य अभियंता बळवंत डोंगरे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, ऍड. विलास मते, अनिल लोणकर, माजी नगरसेविका भाग्यश्री निखाडे, प्राचार्य ज्ञानीराम मस्के, प्राचार्य ओमप्रकाश चोले, प्रा. नागेश घागरे, नगर परिषद अध्यक्ष सुनील डोंगरे, वैशालिताई भावसागर, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश सिदाम, माजी प्राचार्य सुरेश भोवाटे, निवृत्त उपप्राचार्य अन्सारी, दिनेश भुरे, राजेश ओगले, खेमचंद हटवार, मुख्याध्यापक बन्सोड, राजेश दहीवाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नागपूरमधील इंदोरा चौक, हरदोली, पांढरेबोडी, सलाई, आलेसूर, पितेसूर, सलाई बु., बुलढाणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, भंडारा आणि संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान, डॉ. सच्चिदानंद फुलेकर आणि इतर पाहुण्यांच्या हस्ते मुख्याध्यापक, शिक्षक आणि पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार आणि संविधानाच्या प्रती देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनील साखरकर यांनी केले, संचालन वसुधा साखरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्करसिंग पटेल यांनी केले. यावेळी प्रा.अनिल रामटेके, अजय फुलेकर, राजेश गजभिये, प्रा.छाया बुद्धे, मोनिका ठाकूर, सुरेंद्र वहाणे, किशोर झोडे, प्रा.राजेंद्र हेमाणे, प्रेमलता जैतवार, प्रा.सुभाष भोयर, शिशुपाल दमाहे, मनमोहन सिंधुडे, प्रा.डॉ.डॉ.अनळकर, प्रा.डॉ. एन.टी. कापगते, पत्रकार देवचंद टेंभेरे, प्राचार्य राहुल डोंगरे, अशोक हमणे, प्रा.मोहन भोयर, राहुल भुतांगे, ऍड. रोहित बोंबार्डे, सुधीर गोमासे, महेश गायधने, अनिल कारेमोरे, प्रा.संजय नेमाडे, जीवन वनवे, राजू कुंभारे उपस्थित होते. बुद्ध वंदना आणि सामुदायिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. इंदुताई मेमोरियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध गावांतील सरपंच, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी, पत्रकार, समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.

0 Response to "नव्या पिढीने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा - डॉ. सच्चिदानंद फुलेकर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article